मंगळवार, १८ ऑगस्ट, २००९

सर

जेव्हा भर उन्हात पावसाची सर आली
पुन्हा एकदा आज तुझी आठवण आली
सरीसारखीच आली होतीस जीवनात
आठवतय तेव्हा देखील उन्हाळाच होता....इथे

बरसली होतीस, थैमान घातला होतास
अगदी पुरता वाहून गेलो होतो त्यात मी
कशी बाहूत कोसळली होतीस मनापासुन
आठवतय तेव्हा देखील तहानलेलाच होतो....आजच्यासारखा

गेलीस देखील आल्यासारखी तडकाफडकी
तेव्हा ही आला होता पूर इथे - माझ्या डोळ्यांत
पहायचस तरी मागे वळून तिथेच होतो मी
आठवतय का तेव्हा देखील जळतच होतो....सुर्यासारखा

येशील का पुन्हा एकदा, बरसशील का इथे
विझवशील का अखंड जळणारे हे जंगल
वसवशील का नंदनवन या ओसाड रानात
आठवतय तेव्हा देखील माळरानच होतं....आजच्यासारखं

----बाळराजे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger