प्लिज जरा थांबशील का?
नाही मी रागावणार नाही
पण चार शब्द ऐकूनच जा
अगदी शेवटचे...........
तु मुळात बरोबरच आहेस
चुकलो तो केवळ मीच
वेड्या मनाला कळलेच नाही
तुझ्या गालावरची ती खळी
अगदी चिरतरुण आहे ते
तुझे ते स्मित वाटले जणु
रणरणत्या ग्रिष्मात पाऊस
बरसतोय जणु माझ्याचसाठी
भिजलो त्यात चिंब अनेकदा
तेच तुला आज सांगितले
केवळ शब्दांतून..........
नाही म्हणालीस...ठीक आहे
पण तुला काही सांगायचे आहे
अगदी शेवटचेच...........
तुच होतीस एक शांत झुळूक
या करपलेल्या आयुष्यातली
तुच होतीस गर्द सावली
या ओसाड वाळवंटातली
तु नसणार यापुढे...
पण तुझ्या आठवणी...
राहतील अगदी चिरतरुण
तुझ्या गालावरच्या खळीसारख्या
सदैव राहशील तु मनात
एक कवडसा म्हणून...सुखाचा
आणि हो जाता जाता...
तुझा आजचा नकार...
असेल माझ्या आयुष्यातल्या
एका सुखद क्षणांचा अंत
एवढेच.........बस्स....
----बाळराजे
रविवार, १६ ऑगस्ट, २००९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
kavita phaarach surekh!
उत्तर द्याहटवा