मुळात नाझी जर्मनीतील ज्यु लोकांवर झालेल्या अत्याचाराला आणि नाझी छळछावण्यांना खुप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाल्याने त्या काळातील भरमसाठ बाबी दुर्लक्षितच राहिल्या. ज्युंचा झालेला संहारच इतका भयंकर होता की तत्कालीन मुलांच्या स्थितीबद्द्ल भाष्य करण्यात तसेच संशोधनास आपसुकच दुर्लक्ष झाले.
दुसर्या महायुद्धामुळे नाझी जर्मनीतील तसेच इतर राष्ट्रांतील मुलांचे बालपण या ना त्या कारणाने होरपळून निघाले. नाझींच्या जुलमी धोरणांमुळे व छळामुळे प्रत्यक्षरित्या बळी पडलेल्या मुलांची संख्या अंदाजे १५ लाखांपेक्षा अधिक वर्तविली जाते. त्यात सुमारे १२ लक्ष ज्यु मुले, १० हजाराहून अधिक जिप्सी मुले आणि हजारो शारिरीक व मानसिक अपंगांनी विविध कारणांनी प्राण गमावले. जरी ज्यु मुले हे नाझींचे मुख्य लक्ष्य ठरली तरी शेकड्याने ज्युऐतर मुलं हिटलरच्या तथाकथित धोरणांची बळी ठरली. त्यांचे बालपण शुद्ध वंश - सक्षम वंश, सक्षम समाज यांसारख्या अनेक आदर्शाना बळी ठरले. जी मुलं नाझींच्या तथाकथित आदर्शात बसत नव्हती त्यांना त्यांच्या कुटूंबापासून, समाजापासून अलग करून त्यांचे अत्यंत क्रुरपणे निर्दालन करण्यात आले. सक्षम-सुद्रुढ समाज बनवण्याच्या मार्गात अडसर ठरल्याने शेकड्याने शारीरिक व मानसिक द्रुष्ट्या अपंग मुलांची कत्तल करण्यात आली. अशा अनौरस व अक्षम मुलांपासून मुक्त समाज बनवण्याच्या हेतुने नाझींनी खास मोहीम आखली.
पहिल्या महायुद्धानंतर माजलेल्या आर्थिक व सामाजिक अनागोंदीचा फायदा उठवत नाझींनी स्वतःचे एक वेगळे साम्राज्य निर्माण केले. एका विशिष्ठ समाजाला आरोपी ठरवून तथाकथित आदर्शवाद त्यांनी जनमानसात रुजवला. जर्मन जनतेत त्यांनी दहशत निर्माण केली. अशा भेदरलेल्या समाजाचा तसेच गुप्त पोलीस यंत्रनेचा व नाझी आदर्शवादाने भारावलेल्या युवकांचा अक्षम मुलांना अलग करुन त्यांना मानसोपचार केंद्र म्हणवल्या जाणार्या कत्तलखान्यात धाडण्यासाठी वापर करण्यात आला. दुर्बलांचा आवाज दडपवण्यात अग्रेसर असलेल्या नाझींनी वैद्यकीय शास्त्रज्ञ तसेच मानसोपचार तज्ञ यांचा एक गट तयार केला व अशा अनौरस मुलांच्या निर्दालनाच्या योजनेची व त्याच्या अंमलबजावनीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली; हा गट तत्सम क्षेत्रात वर्चस्व राखून होता. हिटलरच्या आदर्शवादाने भारावलेल्या जुलमी नाझी विचारसारणीला दुर्बल मुले हकनाक बळी पडली; एकेकाळची आदर्श सामाजिक संस्थाने - शाळा, महाविद्यालये, दवाखाने काराग्रहे, छळछावन्या व कत्तल करण्याची केंद्रे बनली. अशा मुलांच्या पालकांचा आवाज दडपवून टाकण्यात आला; अशा निर्दालनास त्यांची जणू संमतीच आहे असे भासण्यात आले; अशा केसेसबद्द्ल न्यायालयात दाद मागण्यास मज्जाव करण्यात आला. एकेकाळी आदर्श म्हणून गणली गेलेली, व्यंग असलेल्या व्यक्तींना देखील समान वागणूक देणारी सर्व समावेशक सामाजिक व शैक्षणिक समानतावादी व्यवस्था हिटलरच्या नाझी विचारसारणीची बळी ठरली.
संदर्भ : Hitler's Unwanted Children
दुसर्या महायुद्धामुळे नाझी जर्मनीतील तसेच इतर राष्ट्रांतील मुलांचे बालपण या ना त्या कारणाने होरपळून निघाले. नाझींच्या जुलमी धोरणांमुळे व छळामुळे प्रत्यक्षरित्या बळी पडलेल्या मुलांची संख्या अंदाजे १५ लाखांपेक्षा अधिक वर्तविली जाते. त्यात सुमारे १२ लक्ष ज्यु मुले, १० हजाराहून अधिक जिप्सी मुले आणि हजारो शारिरीक व मानसिक अपंगांनी विविध कारणांनी प्राण गमावले. जरी ज्यु मुले हे नाझींचे मुख्य लक्ष्य ठरली तरी शेकड्याने ज्युऐतर मुलं हिटलरच्या तथाकथित धोरणांची बळी ठरली. त्यांचे बालपण शुद्ध वंश - सक्षम वंश, सक्षम समाज यांसारख्या अनेक आदर्शाना बळी ठरले. जी मुलं नाझींच्या तथाकथित आदर्शात बसत नव्हती त्यांना त्यांच्या कुटूंबापासून, समाजापासून अलग करून त्यांचे अत्यंत क्रुरपणे निर्दालन करण्यात आले. सक्षम-सुद्रुढ समाज बनवण्याच्या मार्गात अडसर ठरल्याने शेकड्याने शारीरिक व मानसिक द्रुष्ट्या अपंग मुलांची कत्तल करण्यात आली. अशा अनौरस व अक्षम मुलांपासून मुक्त समाज बनवण्याच्या हेतुने नाझींनी खास मोहीम आखली.
पहिल्या महायुद्धानंतर माजलेल्या आर्थिक व सामाजिक अनागोंदीचा फायदा उठवत नाझींनी स्वतःचे एक वेगळे साम्राज्य निर्माण केले. एका विशिष्ठ समाजाला आरोपी ठरवून तथाकथित आदर्शवाद त्यांनी जनमानसात रुजवला. जर्मन जनतेत त्यांनी दहशत निर्माण केली. अशा भेदरलेल्या समाजाचा तसेच गुप्त पोलीस यंत्रनेचा व नाझी आदर्शवादाने भारावलेल्या युवकांचा अक्षम मुलांना अलग करुन त्यांना मानसोपचार केंद्र म्हणवल्या जाणार्या कत्तलखान्यात धाडण्यासाठी वापर करण्यात आला. दुर्बलांचा आवाज दडपवण्यात अग्रेसर असलेल्या नाझींनी वैद्यकीय शास्त्रज्ञ तसेच मानसोपचार तज्ञ यांचा एक गट तयार केला व अशा अनौरस मुलांच्या निर्दालनाच्या योजनेची व त्याच्या अंमलबजावनीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली; हा गट तत्सम क्षेत्रात वर्चस्व राखून होता. हिटलरच्या आदर्शवादाने भारावलेल्या जुलमी नाझी विचारसारणीला दुर्बल मुले हकनाक बळी पडली; एकेकाळची आदर्श सामाजिक संस्थाने - शाळा, महाविद्यालये, दवाखाने काराग्रहे, छळछावन्या व कत्तल करण्याची केंद्रे बनली. अशा मुलांच्या पालकांचा आवाज दडपवून टाकण्यात आला; अशा निर्दालनास त्यांची जणू संमतीच आहे असे भासण्यात आले; अशा केसेसबद्द्ल न्यायालयात दाद मागण्यास मज्जाव करण्यात आला. एकेकाळी आदर्श म्हणून गणली गेलेली, व्यंग असलेल्या व्यक्तींना देखील समान वागणूक देणारी सर्व समावेशक सामाजिक व शैक्षणिक समानतावादी व्यवस्था हिटलरच्या नाझी विचारसारणीची बळी ठरली.
संदर्भ : Hitler's Unwanted Children
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा