सोमवार, १२ ऑक्टोबर, २००९

मनं माझे...

जेव्हा जेव्हा मी एखादी ओवी अथवा कडवे वाचतो तेव्हा तेव्हा आपसुकच त्यांत स्वतःचे प्रतिबिंब पाहण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या आदर्शांत स्वतःचे स्थान शोधतो, तसेच यथाशक्ती त्यांना आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. पण का कोण जाणे प्रत्येक वेळी मला वाटते की कोठे तरी काहीतरी चुकत आहे. ज्या गोष्टींना आदर्श मानत असतो त्यांतच गुरफटून जातो. येतात त्या केवळ वेदना! खरेच का आदर्शांना धरून अथवा आचरणात आणून यश मिळवता येते, प्रगती करता येते? आजुबाजुच्या जगात डोकावल्यास लांडी-लबाडी करणारा तर तुपाशी खातो आहे! जेव्हा जेव्हा वाटते की टाकून द्यावे हे सतीचे वाण तेव्हा तेव्हा मनात वसलेला आदर्शवाद उफाळून येतो, पुन्हा मीच स्वतःविरुद्ध बंड करतो पुन्हा एकदा हेच आदर्शवाद रुपी शिवधनुष्य उचलण्यास समर्थ होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger